Sour Gram Yojana Mahavitaran : सौर ग्राम योजनेत प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची निवड | पहा आपल्या जिल्ह्यातील गावांची नावे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sour Gram Yojana Mahavitaran : राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याची नवीन योजना ‘महावितरण’ने तयार केली आहे. तर या योजना मध्ये निवड झालेल्या गावांना दोन महिन्यांत सौर ऊर्जेद्वारे 100 % वीजपुरवठा करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील दोन दोन गावांचा समावेश करण्यात आला आहे.

 

महावितरण’ने तयार केलेल्या या योजना मध्ये निवड झालेल्या गावांत पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत घरगुती ग्राहकांना 3 किलो वॉटपर्यंत ७८ हजार रुपयांची सबसिडी देण्यात येणार असून पाणीपुरवठा व दिवाबत्ती योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी शासकीय निधीतून पैसे उपलब्ध करण्यात येणार आहे. (Sour Gram Yojana Mahavitaran)

 

निवड करण्यात आलेल्या या गावातील सर्व वाणिज्यिक व औद्यगिक ग्राहकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन महावितरणने केलेले आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत निवासी घरगुती ग्राहकांसाठी प्रतिकिलोवॉट 30 हजार रुपये अनुदान दोन किलोवॉटपर्यंत मिळते. तीन किलोवॉटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॉट क्षमतेसाठी 18,000/- अनुदान मिळते. तीन किलोवॉटपेक्षा मोठ्या यंत्रणेसाठी अनुदान 78 हजारांपर्यंत मर्यादित आहे. (Sour Gram Yojana Mahavitaran village list)

 

तर या योजना अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आदर्श गाव, मान्याचीवाडी या गावांना लवकरच सौर ऊर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे ही गावे लवकरच ‘सौरग्राम’ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होणार आहेत.

 

प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याची नवीन योजना ‘महावितरण’ने तयार केली आहे त्या अंतर्गत निवडण्यात आलेली गावे खालील प्रमाणे आहेत.

 

जिल्हा आणि निवडलेली गावे 

 

पुणे परिमंडला अंतर्गत गणेश खिंड मंडळ (शिवतीर्थनगर, सेक्टर २५ निगडी),

बारामती मंडळ (यांजरवाडी कुंभारकर वस्ती, गणेश रोड नानगाव),

जालना जिल्हा (पातोडा, दारेगाव),

बीड जिल्हा (नानदी, आनंदवाडी),

लातूर जिल्हा (नवीन आदर्श कॉलनी, मयूरबन सोसायटी),

हिंगोली जिल्हा (सुलदळी गोरे, दातेगाव),

नांदेड जिल्हा (हाडोळी, दवणगिर),

परभणी जिल्हा (आंबेटाकळी, मुरूमखेडा),

पेण मंडळ (पाडवी पठार, वडवल),

वाशी मंडळ (नेरेपाडा गाव, सिवानसाई गाव),

धुळे जिल्हा (कलगाव, नाथे),

जळगाव जिल्हा (निबोल, पातोंडी),

नंदुरबार जिल्हा (मोहिदा, ब्राह्मणपुरी),

कल्याण मंडळ-१ ( शिरवली कुंभारली),

कल्याण मंडळ-२ (गोलभान, मोहोप),

पालघर जिल्हा (अक्करपट्टी, कोलगाव),

वसई मंडळ (शिवनेरी, निर्वाण),

रत्नागिरी जिल्हा (फुरुस, असुर्डे),

अहमदनगर जिल्हा (पारेगाव, हिवरे बाजार),

मालेगाव मंडळ (वाके, निबोळा),

नाशिक मंडळ (कोनांबे, दारणा सांगवी),

अकोला जिल्हा (सौंदाळा, सांगलुड),

बुलढाणा जिल्हा (बजरंग नगर-सागवान एरिया, सावजी लेआउट, सुटाळा खुर्द),

वाशिम जिल्हा (झकलवाडी, पारवा),

अमरावती जिल्हा (नवाथे, काठोरा),

चंद्रपूर जिल्हा (सोमनाथ, आनंदवन),

गडचिरोली जिल्हा (कोंढाणा, तुंबडी, मेंढा),

भंडारा जिल्हा (भोसा, दहेगाव),

नागपूर ग्रामीण मंडळ (चिखली, सिंधी),

नागपूर शहर मंडळ (किरमीती भारकस, कॉस्मोपॉलिटन),

वर्धा जिल्हा (नागझरी, नेरी मिर्जापूर),

सातारा जिल्हा (आदर्श गाव, मन्याची वाडी),

सोलापूर जिल्हा (चिंचणी, औज),

कोल्हापूर जिल्हा (शेळकेवाडी, पिराचीवाडी),

सांगली जिल्हा (झुरेवाडी, निमसोड)

 

तर या योजना अंतर्गत वरील जिल्ह्यातील  या गावांना लवकरच सौर ऊर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे ही गावे लवकरच ‘सौरग्राम’ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होणार आहेत.